शिवजयंती भाषण
माननीय अध्यक्ष, गुरूजनवर्ग आणि येथे जमलेल्या बालमित्रांनो नमस्कार!
आज शिवजयंती ! महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस!
अवघा महाराष्ट्र जेव्हा मुघलांच्या टाचेखाली चिरडला जात होता. गुलामगिरीच्या अंधारात चाचपडत होता तेव्हा एका तेजस्वी सूर्याने जन्म घेतला आणि शिवनेरी धन्य झाला. हृदयावर आई जिजाऊ यांचे संस्कार मस्तकावर वडील शहाजी राजांचा तसेच देवी तुळजाभवानीचा वरदहस्त, पाठीवर दादोजींचा हात आणि हातात भवानी तलवार घेऊन शिवरायांनी मुघलांच्या छाताडावर पाय रोऊन स्वराज्याची उभारणी केली. यासाठी त्यांना जीवाला जीव देणाऱ्या ,स्वराज्यासाठी छातीचा कोट करून लढणाऱ्या तानाजी , येसाजी , मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या अनेक सवंगड्यांची साथ मिळाली.
असं म्हणतात की चांगला सेनापती चांगला राजा असेलच असं नाही आणि चांगला राजा चांगला सेनापती असेलंच असंही नाही.युद्ध जिंकणं ,लढाया जिंकणं यापलिकडे जिंकलेल्या राज्यातल्या माणसांची मन जिंकणं अतिशय अवघड असतं. शिवाजी महाराजांचं मोठेपण दिसून येत ते इथेच!आधी आणि नंतरही कदाचित युद्धशास्त्र , लढाईचा आवाका ह्या निकषावर त्यांच्यापेक्षा जास्त शूर ,पराक्रमी राजे होऊन गेलेले असतील.मात्र युद्ध जिंकण्यापलीकडे काय करायला हवे याचे अचूक भान शिवरायांना होतं.
स्वप्न सगळेच पाहतात , काही लहान काही मोठी ,काही आवाक्यातली तर काही आवाक्याबाहेरची...
शहाजी राजांनी बघितलेलं स्वराज्याचे स्वप्न अशक्यप्राय आणि प्रचंड मोठा आवाका असलेल होतं.या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मांडलेला राजकारणाचा पट आणि खेळी प्रचंड मोठी होती. महाराष्ट्रात जिजाऊंनी शिवाजीराजांना घेऊन स्वराज्याचा पाया घालायचा आणि त्याला पाठबळ देण्याचं काम शहाजीराजे दक्षिणेत राहून करणार.दक्षिणेत असलेले राजे आपल्या बाजूला वळवून घेऊन सगळ्यांची एकत्र मोट बांधून मग सगळा दक्षिण भारत दिल्लीच्या सत्तेच्या विरोधात उभा करून दिल्लीची सत्ता मोडून काढायची. या रणनीतीचा भाग म्हणून शिवाजी राजांनी गोवळकोंडा सारख्या राज्याशी मैत्री जोपासली , इतरही भागात जिथे राज्य जिंकली तिथले राजे कायम ठेवून आपले मांडलिक बनवले.
शिवाजी महाराजांना जर दीर्घायुष्य लाभलं असतं तर कदाचित तरुण संभाजीराजांच्या मदतीने भारताच्या राजकारणाचा इतिहास बदलला असता.पण इतिहासात जर - तर ला स्थान नाही.
राजांच्या आयुष्यातल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या घटना - अफजलखान वध,पन्हाळ्याहून सुटका , शाहिस्तेखानाची फजिती,आग्र्याहून सुटका हे प्रसंग बाजूला ठेवून राजे बघितले तर मग त्यांचं व्यक्तिमत्व अजूनच उत्तुंग आणि भव्य दिसतं. छोटे छोटे तपशील घेऊन अभ्यासले तरीही ज्या प्रदेशावर आपण राज्य करतो त्या प्रजेला ते राज्य आणि तो राजा आपला वाटला पाहिजे या भावनेतून त्यांनी सगळे निर्णय घेतले.
जुलमाचा रामराम घालून पैशासाठी लढणारी फौज सगळ्याच राजांकडे होती मात्र हे राज्य आपलं आहे या भावनेतून राजासाठी आणि राज्यासाठी हसतहसत मृत्यूला कवटाळणारे जिगरबाज वीर निर्माण करणं आणि ती प्रेरणा माणसांच्या मनात निर्माण करण हे खरं राजेपण.हि प्रेरणा काही एका रात्रीत झालेली नव्हती. छोटे छोटे निर्णय घेऊन त्यांनी रयतेच्या मनात विश्वास निर्माण केला आणि मग रयत तिथपर्यंत आली.त्याचा परिपाक म्हणून संभाजी राजांच्या हत्येनंतर स्वराज्य बुडवायला महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबाला २७ वर्षे झगडूनही पदरी अपयश आलं आणि दक्षिण जिंकण्याचं स्वप्न अधूरं ठेवून आलमगीराने नगरजवळ शेवटचा श्वास घेतला.
आरमाराची उभारणी , व्यापाराला परवानगी , शेतसारा , पीककर्ज ,पाण्याची व्यवस्था, स्थैर्य अशा प्रत्येक पातळीवर राजांचे निर्णय त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात.
राजांच्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या घटना - रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा , हिरकणीचा केलेला सन्मान आणि दक्षिणेत सरदार स्त्रीची विटंबना झाली म्हणून आपल्या सरदारांना केलेली शिक्षा. 'अशीच आमुची आई असती आम्हीही सुंदर झालो असतो' असं म्हणून चोळीबांगडी देऊन सन्मानानं तिची केलेली रवानगी यावरून शिवरायांच्या मनात स्त्रियांबद्दल किती आदर होता याची जाणीव होते.
ह्या घटना डोळसपणे पाहणाऱ्या महाराष्ट्रातील स्त्रियांना आपला राजा नेमका कसा आहे हे समजलं आणि त्यांनी हे राजांचं मोठेपण अनुभवून त्यांच्यावर विश्वास टाकला. हाच विश्वास त्यांनी पुढील पिढ्यामध्ये संक्रमित केला म्हणून अवघा महाराष्ट्र शिवाजी-संभाजी महाराज नसतानाही मुघलांशी झुंजत राहिला. माणसांच्या मनात राज्य आपलं आहे हा विश्वास निर्माण करणं आणि मग त्या माणसांनी ते राज्य आपलं म्हणून त्याचं रक्षण करणं हि त्याकाळातली अतिशय दुर्मिळ घटनाच महाराजांचं मोठेपण लखलखीतपणे पुढे मांडते.
ज्या काळात मुगल साम्राज्यात आणि सगळ्याच भारतात राज्यासाठी बाप पोराला ,पोरगा बापाला अटकेत टाकून प्रसंगी त्याचा गळा कापून गादी बळकावत असताना मावळे मात्र आपल्या राजाच्या स्वप्नासाठी प्राण ओवाळून टाकत होते.सध्याच्या काळात हे जास्त प्रकर्षाने जाणवतंय ते हे की महाराजांनी माणसांना नेमकं कसं उभं केलं ! राष्ट्र मोठं होतं ते सामान्य माणसांनी राष्ट्राला आपलं म्हणून त्याचं रक्षण करायची कृती केल्याने!
आजच्या काळात रक्षण करायला कुणाला ढाल-तलवार घेऊन लढायला जायचं नाही तर हि लढाई आपल्याच मनात दडून बसलेल्या प्रवृत्तीशी आहे.राष्ट्राची संपत्ती , राष्ट्राचा लौकिक, बौद्धिक संपदा हि आपलीच असून तिची जबाबदार नागरिक म्हणून वागून आपल्या कृतीने रक्षण केलं तर ती वृद्धिंगत होईल हाच धडा आजच्या दिवशी घ्यायला हवा.अन्यथा फक्त पुतळे उभारून ,मोठमोठी स्मारकं उभारून सोहळा साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी सगळं काही विसरून गेलो तर मग उपयोग नाही.हि समज सगळ्यांनी आपल्या कृतीतून आणावी आणि शिवरायांचं स्वराज्य स्वप्रयत्नाने एकजुटीने सुराज्य करावं. तरच ती शिवरायांना दिलेली खरी मानवंदना ठरेल.
महाराष्ट्राच्या या मानबिंदूला , मार्गदर्शकाला आणि या मराठी मातीला मानाचा मुजरा करून थांबते. जय महाराष्ट्र!!
माननीय अध्यक्ष, गुरूजनवर्ग आणि येथे जमलेल्या बालमित्रांनो नमस्कार!
आज शिवजयंती ! महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस!
अवघा महाराष्ट्र जेव्हा मुघलांच्या टाचेखाली चिरडला जात होता. गुलामगिरीच्या अंधारात चाचपडत होता तेव्हा एका तेजस्वी सूर्याने जन्म घेतला आणि शिवनेरी धन्य झाला. हृदयावर आई जिजाऊ यांचे संस्कार मस्तकावर वडील शहाजी राजांचा तसेच देवी तुळजाभवानीचा वरदहस्त, पाठीवर दादोजींचा हात आणि हातात भवानी तलवार घेऊन शिवरायांनी मुघलांच्या छाताडावर पाय रोऊन स्वराज्याची उभारणी केली. यासाठी त्यांना जीवाला जीव देणाऱ्या ,स्वराज्यासाठी छातीचा कोट करून लढणाऱ्या तानाजी , येसाजी , मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या अनेक सवंगड्यांची साथ मिळाली.
असं म्हणतात की चांगला सेनापती चांगला राजा असेलच असं नाही आणि चांगला राजा चांगला सेनापती असेलंच असंही नाही.युद्ध जिंकणं ,लढाया जिंकणं यापलिकडे जिंकलेल्या राज्यातल्या माणसांची मन जिंकणं अतिशय अवघड असतं. शिवाजी महाराजांचं मोठेपण दिसून येत ते इथेच!आधी आणि नंतरही कदाचित युद्धशास्त्र , लढाईचा आवाका ह्या निकषावर त्यांच्यापेक्षा जास्त शूर ,पराक्रमी राजे होऊन गेलेले असतील.मात्र युद्ध जिंकण्यापलीकडे काय करायला हवे याचे अचूक भान शिवरायांना होतं.
स्वप्न सगळेच पाहतात , काही लहान काही मोठी ,काही आवाक्यातली तर काही आवाक्याबाहेरची...
शहाजी राजांनी बघितलेलं स्वराज्याचे स्वप्न अशक्यप्राय आणि प्रचंड मोठा आवाका असलेल होतं.या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मांडलेला राजकारणाचा पट आणि खेळी प्रचंड मोठी होती. महाराष्ट्रात जिजाऊंनी शिवाजीराजांना घेऊन स्वराज्याचा पाया घालायचा आणि त्याला पाठबळ देण्याचं काम शहाजीराजे दक्षिणेत राहून करणार.दक्षिणेत असलेले राजे आपल्या बाजूला वळवून घेऊन सगळ्यांची एकत्र मोट बांधून मग सगळा दक्षिण भारत दिल्लीच्या सत्तेच्या विरोधात उभा करून दिल्लीची सत्ता मोडून काढायची. या रणनीतीचा भाग म्हणून शिवाजी राजांनी गोवळकोंडा सारख्या राज्याशी मैत्री जोपासली , इतरही भागात जिथे राज्य जिंकली तिथले राजे कायम ठेवून आपले मांडलिक बनवले.
शिवाजी महाराजांना जर दीर्घायुष्य लाभलं असतं तर कदाचित तरुण संभाजीराजांच्या मदतीने भारताच्या राजकारणाचा इतिहास बदलला असता.पण इतिहासात जर - तर ला स्थान नाही.
राजांच्या आयुष्यातल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या घटना - अफजलखान वध,पन्हाळ्याहून सुटका , शाहिस्तेखानाची फजिती,आग्र्याहून सुटका हे प्रसंग बाजूला ठेवून राजे बघितले तर मग त्यांचं व्यक्तिमत्व अजूनच उत्तुंग आणि भव्य दिसतं. छोटे छोटे तपशील घेऊन अभ्यासले तरीही ज्या प्रदेशावर आपण राज्य करतो त्या प्रजेला ते राज्य आणि तो राजा आपला वाटला पाहिजे या भावनेतून त्यांनी सगळे निर्णय घेतले.
जुलमाचा रामराम घालून पैशासाठी लढणारी फौज सगळ्याच राजांकडे होती मात्र हे राज्य आपलं आहे या भावनेतून राजासाठी आणि राज्यासाठी हसतहसत मृत्यूला कवटाळणारे जिगरबाज वीर निर्माण करणं आणि ती प्रेरणा माणसांच्या मनात निर्माण करण हे खरं राजेपण.हि प्रेरणा काही एका रात्रीत झालेली नव्हती. छोटे छोटे निर्णय घेऊन त्यांनी रयतेच्या मनात विश्वास निर्माण केला आणि मग रयत तिथपर्यंत आली.त्याचा परिपाक म्हणून संभाजी राजांच्या हत्येनंतर स्वराज्य बुडवायला महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबाला २७ वर्षे झगडूनही पदरी अपयश आलं आणि दक्षिण जिंकण्याचं स्वप्न अधूरं ठेवून आलमगीराने नगरजवळ शेवटचा श्वास घेतला.
आरमाराची उभारणी , व्यापाराला परवानगी , शेतसारा , पीककर्ज ,पाण्याची व्यवस्था, स्थैर्य अशा प्रत्येक पातळीवर राजांचे निर्णय त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात.
राजांच्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या घटना - रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा , हिरकणीचा केलेला सन्मान आणि दक्षिणेत सरदार स्त्रीची विटंबना झाली म्हणून आपल्या सरदारांना केलेली शिक्षा. 'अशीच आमुची आई असती आम्हीही सुंदर झालो असतो' असं म्हणून चोळीबांगडी देऊन सन्मानानं तिची केलेली रवानगी यावरून शिवरायांच्या मनात स्त्रियांबद्दल किती आदर होता याची जाणीव होते.
ह्या घटना डोळसपणे पाहणाऱ्या महाराष्ट्रातील स्त्रियांना आपला राजा नेमका कसा आहे हे समजलं आणि त्यांनी हे राजांचं मोठेपण अनुभवून त्यांच्यावर विश्वास टाकला. हाच विश्वास त्यांनी पुढील पिढ्यामध्ये संक्रमित केला म्हणून अवघा महाराष्ट्र शिवाजी-संभाजी महाराज नसतानाही मुघलांशी झुंजत राहिला. माणसांच्या मनात राज्य आपलं आहे हा विश्वास निर्माण करणं आणि मग त्या माणसांनी ते राज्य आपलं म्हणून त्याचं रक्षण करणं हि त्याकाळातली अतिशय दुर्मिळ घटनाच महाराजांचं मोठेपण लखलखीतपणे पुढे मांडते.
ज्या काळात मुगल साम्राज्यात आणि सगळ्याच भारतात राज्यासाठी बाप पोराला ,पोरगा बापाला अटकेत टाकून प्रसंगी त्याचा गळा कापून गादी बळकावत असताना मावळे मात्र आपल्या राजाच्या स्वप्नासाठी प्राण ओवाळून टाकत होते.सध्याच्या काळात हे जास्त प्रकर्षाने जाणवतंय ते हे की महाराजांनी माणसांना नेमकं कसं उभं केलं ! राष्ट्र मोठं होतं ते सामान्य माणसांनी राष्ट्राला आपलं म्हणून त्याचं रक्षण करायची कृती केल्याने!
आजच्या काळात रक्षण करायला कुणाला ढाल-तलवार घेऊन लढायला जायचं नाही तर हि लढाई आपल्याच मनात दडून बसलेल्या प्रवृत्तीशी आहे.राष्ट्राची संपत्ती , राष्ट्राचा लौकिक, बौद्धिक संपदा हि आपलीच असून तिची जबाबदार नागरिक म्हणून वागून आपल्या कृतीने रक्षण केलं तर ती वृद्धिंगत होईल हाच धडा आजच्या दिवशी घ्यायला हवा.अन्यथा फक्त पुतळे उभारून ,मोठमोठी स्मारकं उभारून सोहळा साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी सगळं काही विसरून गेलो तर मग उपयोग नाही.हि समज सगळ्यांनी आपल्या कृतीतून आणावी आणि शिवरायांचं स्वराज्य स्वप्रयत्नाने एकजुटीने सुराज्य करावं. तरच ती शिवरायांना दिलेली खरी मानवंदना ठरेल.
महाराष्ट्राच्या या मानबिंदूला , मार्गदर्शकाला आणि या मराठी मातीला मानाचा मुजरा करून थांबते. जय महाराष्ट्र!!
No comments:
Post a Comment