परिपाठ

या शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा!!

Tuesday, October 13, 2020

मुलाखत

 उपक्रम ~ मुलाखत.


 मुलाखत म्हणजे संवाद. मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो. तो हेतूपूर्वक घडवून आणला जातो. मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि ती मुलाखत ऐकणारा, पाहणारा वाचणारा या तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडते ' जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि आणि कर्तुत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत होय.' थोडक्यात दोन व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक, भावनिक संवाद म्हणजे मुलाखत होय. ज्यांच्याजवळ 'सांगण्यासारखे' काही आहे आणि ज्यांच्याकडून 'ऐकण्यासारखे' काही आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाऊ शकते.


मुलाखतीचा हेतू~ (०१) मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी (०२) त्या व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी. (०३) अनेकांच्या संघर्षगाथा असतात. जनमाणसांच्या मनात तो संघर्ष जाणून घेण्याची इच्छा असते. ती इच्छा जाणून घेण्यासाठी. (०४) व्यक्तीच्या कर्तुत्वाबरोबर त्या व्यक्तीच्या आत दडलेला माणूस समजून घेण्यासाठी. (०५) विचारवंतांची विविध विषयांवरील मते जाणून घेण्यासाठी. (०६) एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून नवे काही माहीत करून घेण्यासाठी.


पेन व वहीमध्ये झालेली मुलाखत/संवाद.


 घंटा वाजली तशी मुले शाळेत गेलीत. परिपाठ संपला व मुले लगबगीने आपापल्या वर्गात जाऊन बसली. मुलांच्या मागून लगेच गुरुजी वर्गात दाखल झाले. मुलांची हजेरी झाली तसे लगेच गुरुजींनी प्रत्येक मुलांना वही-पेन काढण्यास सांगीतले. दप्तरातून मुलांनी आपापली वही-पेन बाहेर काढली. गुरुजींनी मुलांना आपल्या आवडीचे दोन-तीन चित्रे काढण्यास सांगितली. 

   तेव्हा वही व पेनमध्ये झालेला संवाद.


वहीताई: - काय पेनदादा, आज काय लिहायचं ठरवलय?


पेनदादा:- वहीताई, गुरुजींनी आवडीची चित्रे गिरवण्यास सांगितली.


वही ताई:- व्वा! आवडीची चित्रे. मग आज नेमके कोणती आणि कशाची चित्रे काढशील?


पेनदादा:- अग वहीताई, थोडा विचार करू दे की.


वहीताई:- होय बाबा, विचार तर करावाच लागेल. कोणतीही गोष्ट विचारात घेतल्याशिवाय कसली शक्य? कोणत्याही निर्मितीचा उगम हा विचारातूनच होत असतो.


पेनदादा:- ताई, काढण्यासारखी तर भरपूर चित्रे आहेत, परंतु कोणती चित्रे काढावीत यासाठी मनात थोडा गोंधळ चालू आहे.


वहीताई:- होय का. मी काही चित्रे काढायची सुचवू का?


पेनदादा:- वाह! मग तर फारच छान होईल.


वहीताई:- बघ पेनदादा, आज हल्ली माणूस निसर्गात सौंदर्य घालणारी चित्रे काढताना दिसतो परंतु निसर्गाचा र्‍हास होतानाची चित्रे रेखाटताना मात्र फारसा आढळत नाही. त्याला निसर्गाचा ऱ्हास होत आहे हे माहीत नाही असं सुद्धा होत नाही परंतु याकडे माणूस हल्ली दुर्लक्षीत झाला आहे हे सत्य नाकारता येत नाही.


पेनदादा:-अगदी खरयं ताई, निसर्गात कोणकोणते घटक असतात?


वही ताई:- प्राणी, वनस्पती, मृदा, हवामान, पाणी, हवा, अन्न, वृक्ष आदि.


पेनदादा:- छान ताई, तर आज मी या घटकांवर आधारित चित्रे काढणार आहे.


वहीताई:- ऑल दि बेस्ट दादा, नंतर कोणती चित्रे काढलीत त्या संदर्भाने मला सांगशील.


पेनदादा:- होय ताई नक्कीच, काढलेली चित्रे मी तुला दाखवणार बरं का.


पेनदादा चित्रे काढतो व वहीताईला दाखवतो.


वहीताई:- पेनदादा, ही चित्रे?


पेनदादा:- होय ताई, अन्नाची नासाडी, नानाविध व्यसन व हवा प्रदूषण दर्शविणारी चित्रे काढलीत.


वहीताई:- दादा, तुला ही चित्रे कशी काय सुचली रे?


पेनदादा:- काय सांगू ताई, मी सुटाबुटातल्या, नोकरदारांच्या, सुशिक्षित माणसांच्या प्रत्‍येकाच्‍या खिशाला असतो ना. तेव्हा मला ही चित्रे सहज दिसतात, पण या बुद्धिजीवी मानव प्राण्याला दिसत नसेल का? की त्यांना कळत नसेल? की जाणवत नसेल? लग्नसमारंभात, वेगवेगळ्या पार्टीमध्ये लोक जेवताना अन्नाची नासाडी करतात. गरजेपेक्षा जास्त अन्न ताटात घेतात व त्यामुळे शिल्लक अन्न तसेच ताटात ठेवतात त्यामुळे शिल्लक अन्न वाया जाते. अन्नाच्या नासाडीमुळे अनेक नैसर्गिक स्रोतांचीही नासाडी होते. अन्नधान्य पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यापैकी २० ते २५% पाणी वाया जाते. वीज, खत, फवारणी, शेतकऱ्यांच त्यामागील अथक परिश्रम अशा अनेक गोष्टी नासाडीमुळे अप्रत्यक्षपणे वाया जातात. गरीबीमुळे अनेक जण उपाशीपोटी आहे आणि इकडे मात्र अशा लोकांमुळे अन्न वाया जात आहे. हे या लोकांना का बर कळत नसेल. अन्न वाया घालवणार्‍या लोकांसाठी हे चित्र मी रेखाटले आहे. या चित्रातून अन्नाचे महत्त्व तरी त्यांच्या लक्षात येईल असे मला वाटते. 

    दुसरे चित्र हे माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. औद्योगिक, वाहतूक, वाढती लोकसंख्या यामुळे पृथ्वीवर कमालीचे प्रदूषण वाढलेय. या प्रदूषणाचे परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीला व मानवजातीवर होऊ लागलेत. हवा प्रदूषणातील विषारी वायू, धूर, धुलिकण, सुक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थांमुळे मानवाचे पर्यायाने निसर्गाचे वयोमान दिवसेंदिवस कमी होत आहे. माणसाने त्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी व हव्यासापाई निसर्गाला दुर्लक्षित करत आहेत. हवा प्रदूषणामुळे माणसांच्या शरिरावर विपरित परिणाम होत आहे. हे माणसाला माहित असूनही त्याकडे डोळेझाक करत आहेत.

    तसेच तंबाखू, गुटखा, सिगारेट, बिडी, मद्यप्राशन आदी. सेवनाचे प्रमाण सुद्धा बुद्धीजीवी प्राण्यामध्ये विपुल प्रमाणात वाढलेले आहेत. या सेवनामुळे तोंड, घसा, फुफ्फुस, पोट, किडनी व मूत्राशयाचा कर्करोग होतो. हृदयरोग व रक्तवाहिन्यांचे विकार, मेंदूचे विकार, छातीत दुखणे, हृदयविकाराचा झटका येणे असे अनेक प्रकारचे विकार होतात. या सेवनाचे दुष्परिणाम माहीत असतानाही, जनजागृती होत असतानाही लोक राजरोसपणे या व्यसनाचे सेवन करताना दिसत आहेत. अशा मानसिकतेला काय म्हणावे बरं?

   या चित्रांमधून लोकांना चांगला संदेश, उपदेश मिळावा म्हणून ही चित्रे काढली आहेत.


वहीताई:- अगदी खरयं दादा, तू जे सांगितले ते अगदी खर आहे. सारासार विचार न करता माणूस या सेवनांच्या पूर्णता आहारी गेला आहे. त्यामुळे कुटुंबात, समाजात वाद होत आहेत. माणसांची मानसिकता दिवसेंदिवस ढासळत आहे. आयुष्य हे एकदाच मिळते हे बर्‍याच लोकांना का बरं कळत नसेल? का बरं उमजत नसेल? अशा या व्यसनी व समस्या निर्माण करणार्‍या माणसांमुळे कुटुंबातील इतर सदस्यांना, समाजाला व देशाला त्रास सहन करावा लागतो. अशा या व्यसनी, हव्यासी लोकांमुळे कुटुंबाची, समाजाची पर्यायाने देशाची प्रगती होणे थांबते हे या लोकांना का बरं कळत नसेल? म्हणतात ना विकृत बुद्धि विनाशाला आमंञित करते.

    समाजातील, पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात? हे या बुद्धिजीवी प्राण्याला का समजू नये किंवा का बरं समजत नसेल? मानवाला, संपूर्ण सजिवसृष्टीला व निसर्गाला विघातक ठरणाऱ्या अशा प्रकारच्या समस्या, प्रदुषके कुठेतरी, केव्हातरी थांबणे, थांबवणे खुप गरजेचे आहे. अन्यथा मानवनिर्मित समस्या, प्रदूषके नष्ट करणे खूप खूप कठीण असेल.

   खरच प्रत्येक माणसाने या समस्यांवर, प्रदूषकांवर जाणीवपूर्वक व गांभिर्याने विचार करून आपल्यामुळे कोणालाही ञास होणार नाही अश्या स्वरूपाचे चांगले जीवन व्यतीत करावे हीच अपेक्षा.


   अशाप्रकारे वही व पेनधील मुलाखत/संवाद घडून आला.


मुलाखत निर्मिती व लेखन~ संतोष मो. मनवर

जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा जि.प. वाशिम

Sunday, October 4, 2020

वाचनातून माहितीचे संग्रहण.

 उपक्रम~ *वाचनातून माहितीचे संग्रहण.*


उपक्रमाचा हेतू~ *(०१) अर्थाचे आकलन होणे. 

(०२) लेखनामागील हेतू, भूमिका व संदर्भ समजणे हा होय.*


उपक्रमाची कार्यवाही~ 

(A) विद्यार्थ्यांचे दोन-दोनचे गट करा.

(B) लग्नपत्रिका/वर्ग  क्षमतेनिहाय सोपे परिच्छेद उपलब्ध करा. 

(C) लग्नपत्रिका/परिच्छेद दोघांनाही सहज दिशेल अशी ठेवा. 

(D) लग्नपत्रिकेवर/परिच्छेदावर आधारित प्रश्नांची यादी तयार करा. 

(E) या प्रमाणे गटात दोघांसाठी प्रश्न विचारा. 

(F) विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जो विद्यार्थी सर्वात आधी देईल त्याला एक गुण द्या. 

(G) अशाप्रकारे ज्या गटाला सर्वात जास्त गुण आहे अशा विद्यार्थ्यांना विजयी घोषित करा.

    अशाप्रकारे हा उपक्रम शाळेत घ्यावा.

उदाहरणादाखल काही प्रश्न- -

जसे- 

(1) या कार्डावरील निमंत्रण कशाचे आहे? 

(2) लग्न पत्रिकेवरील वधुचे व वराचे नाव काय? 

(3) वधुच्या वडिलांचे नाव काय आहे? 

(4) वराच्या वडिलांचे नाव काय आहे? 

(5) वधूचे संपूर्ण नाव काय? 

(6) वराचे संपूर्ण नाव काय? 

(7) वधू कोणत्या गावची आहे? 

(8) वर कोणत्या गावचा आहे? 

(9) लग्नपत्रिका वधूकडील आहे की वराकडील? हे तुम्ही कशावरून ओळखले? 

(10) लग्न कुठे आहे? 

(11) लग्न कोणत्या तारखेला आहे? 

(12) लग्न कोणत्या महिन्यात आहे? 

(13) लग्नाची वेळ किती? किंवा लग्न लागण्याची वेळ काय आहे?  

(14) लग्नाचा वार कोणता आहे? 

(15) लग्न पत्रिकेतील लग्नाचा  इंग्रजी महिना, दिनांक व साल कोणते? 

(16) वराच्या राहण्याचा पत्ता काय आहे? 

(17) लग्नपत्रिका कोणत्या प्रेसमध्ये छापल्या आहेत? (18) स्वागतोत्सुक कोण आहेत? 

(19) आहेरासंबंधी काही उल्लेख आहे का? काय उल्लेख आहे?

(20) लग्नाची पत्रिका वाचताना कोणत्या बाबी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे? 

(21) महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवल्या नाहीत तर काय होईल?

(22) लग्न, वधु, वर, कन्या, चिरंजीव, ज्येष्ठ या शब्दांचा समानार्थी शब्द लिहा/सांगा. 

(23) वधूच्या  तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव काय? 

(24) वराच्या तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव काय? 

(25) वधू वडिलांची कितवी कन्या आहे ?




अध्ययन निष्पत्ती~ (०१) वाचनप्रक्रियेतील घटक जसे-  शब्दबोध, वाचनदिशा, पुनर्दृष्टिक्षेप, दृष्टीचा आवाका, शब्दोच्चारण, आकलन, आस्वादन, शब्दसंग्रह आदी बाबी विचारात घेतात.

(०२) मजकुरातील महत्त्वाचा तपशील समजून घेतात. 

(०३) अक्षरावरील, शब्दावरील नजरेचा आवाका अधिक वाढवून वाचन गतिमान कसे होईल यासाठी वाचनाचा सराव करतात. 

(०४) वाचनाचे महत्त्व लक्षात घेतात.


उपक्रमाची निर्मिती व लेखन~

*संतोष मो. मनवर*

जि.प.उ.प्राथ. शाळा पंचाळा.

Friday, September 11, 2020

शिक्षक दिन

*शिक्षक दिन*

5 सप्टेंबर - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवस आणि त्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. 'गुरु' यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं आणि ते कुणी नाकारू शकत नाही. परंतु आज अशा आदर्श शिक्षकांपेक्षा ही आदर्श विद्यार्थ्यांची समाजाला प्रचंड गरज आहे. पन्नास मुलांना एका वर्गात निरपेक्षपणे आणि सारखे ज्ञान देणारा शिक्षक असतो पण ते ज्ञान आत्मसात करून सुजाण नागरिक म्हणून यशस्वी होणारे पन्नास नसतात हे आपण समजून घ्यायला हवे. त्यामुळे उत्तम शिक्षक असूनही एक वाईट विद्यार्थी त्यांच्या पासून काहीही शिकू शकत नाही तर साधारण शिक्षक लाभून त्यांच्याकडून शिकून आपल्या आयुष्यात प्रचंड यशस्वी होणारा हा उत्तम विद्यार्थी आजच्या काळात अतिशय महत्त्वचा ठरतो. 

डॉ APJ अब्दुल कलाम पासून ते सचिन तेंडुलकर पर्यंत आज सर्वोच्च यशाची ही उदाहरणे हेच सिद्ध करतात की अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही केवळ एक उत्तम विद्यार्थी असल्यामुळेच अशी आश्चर्यकारक झेप त्यांना घेता आली. त्याच्या उत्तम विद्यार्थी गुणांमुळे त्यांचे गुरू आदरणीय झालेत. गुरू नेहमी निरपेक्षपणे आपले काम करतो. त्याचे ज्ञान अविरतपणे तो सर्वांना देत असतो. तो सर्वोच्च आहे आणि राहणार. 

निसर्ग माणसाचा पहिला गुरू. जन्म झाल्यावर श्वास घ्यायला लावणारा अन भूक लागली की रडायला शिकवणारा निसर्ग माणसाला आयुष्यभर शिकवित राहतो. फरक एवढाच की शाळेतील शिक्षक आधी शिकवतो अन मग परीक्षा घेतो. पण निसर्ग नावाचा शिक्षक मात्र आधी परीक्षा घेतो अन मग शिकवतो. निसर्गाच्या शिकण्याचा खरा अर्थ समजणारे आणि त्यातून आपल्या जीवनाचे कल्याण करणारे विद्यार्थी हे सर्वश्रेष्ठ. आपल्या जीवनाचे खरे प्रारुप, जन्म घेण्याचे उद्दिष्ट, आपल्या असण्याचे कारण जर कुणी खऱ्या अर्थाने समजावून सांगू शकत असेल तर तो निसर्ग. या निसर्गातूनच दिव्य दृष्टी लाभलेले भगवान बुद्ध आपण पाहिले. एक उत्तम विद्यार्थी एका बोधी वृक्षाखाली बसुन याच निसर्गाकडून ज्ञान प्राप्त करून भगवान बुद्ध बनले. 

आई ही माणसाला लाभलेली दुसरा शिक्षक. जगातील सगळ्या आई आपल्या मुलांवर सारखे आणि अतोनात प्रेम करतात आणि त्यांना शिक्षण देतात. पण श्यामची आई जर आज अजरामर झाली असेल तर ती साने गुरुजीं सारख्या उत्तम विद्यार्थ्यामुळे. आपले गुरू, आई यांना जर खरी आदरांजली द्यायची असेल तर ते काम एक उत्तम विद्यार्थीच करू शकतो.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही फक्त एक उत्तम विद्यार्थी असल्यामुळेच यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी पुराणकाळातील कर्ण पासून ते आजच्या काळातील महापुरुषांच्या यादीत एक यशस्वी विद्यार्थी दडलेला आपणास सापडेल. शिक्षकांचे काम प्रत्येक विद्यार्थ्यांला उत्तम नागरिक बनविण्यासाठी ठिणगी देण्याचे असते. अशा अनेक ठिणग्या ते सतत आपल्या सभोवताली ते पाडत असतातही पण अशा ठिणग्या आपल्या हृदयात घेऊन त्याची ज्वाला बनायला एक ज्वालाग्राही जमीन लागते, ती एका उत्तम विद्यार्थ्या कडेच असू शकते. नाहीतर अशा कितीही ठिणग्या पडून काही उपयोग होत नाही आणि म्हणूनच सर्व समान परिस्थिती, समान शिक्षक असूनही फक्त उत्तम विद्यार्थीच आयुष्यात प्रगती करू शकतात. 

प्रत्येक गुरू सुद्धा एक उत्तम विद्यार्थी असल्याशिवाय गुरू होऊ शकत नाही आणि गुरू व्हायला जरी वयाची थोडी गरज असू शकते पण विद्यार्थी म्हणून तुम्ही सुरवात करून आयुष्यभर एक विद्यार्थी म्हणून तुम्ही जगू शकता. एक उत्तम विद्यार्थी व्हायला वयाची अजिबात अट नाही. जीवनात आलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कर्तृत्वाने अन चतुराईने संकटांवर मात करणारा एक उत्तम विद्यार्थी हाच इतर लोकांसाठी गुरू असू शकतो आणि तोही आयुष्यात कुठल्याही क्षणी होऊ शकतो. 

गुरू सर्वगुणसंपन्न आहे... गुरू सर्वव्यापी आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे. पण तो सापडायला मात्र एक उत्तम विद्यार्थी असणे हाच सर्वात सोपा मार्ग आहे. 

गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेव महेश्वर:। 

गुरु साक्षात्परब्रह्म तस्मैश्री गुरुवे नम:।।

Saturday, April 11, 2020

Describing Words.

                    ~Activity~ 
*Describing words.*

(01) Write some sentences using noun and describing words on blackboard. for ex. -
He is a good boy.
Monkeys have short tails.
I have a pink bat.
These grapes are sour.
You are nice girl.
A square has four sides.
A rabbit is a small animal. etc.*

(02) Say to the students to read the given sentences carefully.

(03) Now,  introduce them about the describing words and nouns. such as- (the words before the nouns tell us about the nouns. They are describing words. It tell us more about the nouns- *shape, size, colour, age, number, taste and how something feels.)*

for ex.
(a) 🌳 Tall tree, 🥦short tree, 🍀green leaf.
(b) 😊Happy boy, 👨‍💼small boy.
(c) red balloon,
(d) sour grapes,
(e)🌕 full moon.* etc.

(04) Now, form a coloum and say them to write the sentences and front of them in column write the describing words and the nouns they describe in the columns.


Here are given some examples.

(01) The king was a kind man.
(02) I read a good story
(03) She drank some hot milk.
(04) Your shirt is dirty.
(05) That lake is deep.
(06) Those cups are full.
(07) Moti is a active dog.
(08) There are two apples on the table.
(09) That is a beautiful peacock.
(10) An elephant is the huge animal.

Concept and written by~
Santosh M. Manwar.

Let's Think.

*My Activity, My Creations.*

*Thinking* is a *mental attitude* in which we expect *good and favorable* results. When students find and get results, they feel more *happy* and try to get *abstract ideas* from *thinking and guessing.*

    Students are a *quick thinkers* according their *understanding level,* they *pick up* new *informations and ideas* easily if we give them opportunity to *think and guess.*

      Its our *prime role* to make students *to think & guess.*

To develop their *thinking power* we can conduct several *games and activities.*
              Today, I conducted *English activity.* for *std 2nd to 4th.*

 The name of activity is *Listen and guess (Let's think)*

The main aim of this activity is *To listen and guess the riddles.*

Required educational aids~ *Some riddles*(In pictures or in sentences)

*Execution of activity.*~
(01) As a facilator, tell students to listen carefully and guess what am I going to say?
(02)for ex.  (a) *I come after 'R' and before 'T'. Which letter am I?* 

(b) *I like the colour of grass. It is.........*

(c) *What is common between rose and cactus, butterfly and bird?*
(03) Now, say them to think, guess and write my name in your notebook. Answers for ex.(a)~*S* (b)~*green* (c) ~*thorns, wings*

(04) Now, ask them to check the answer of each others.

(05) Encourage to the students to construct riddles according their understanding level.

Here are some riddles. Lets Think and write --

 *(०१) I am a big animal. I have large ears. You can sit on me & have a ride. I have a trunk. Who am I?* *(०२) I eat grass. I give (you) milk. I cry moo. Who am I?
(०३) I like the colour of the sky. It is ........  *
(०४) I have hands, but I can't clap. Who am I?
(०५) I see with my........
(०६) I write with my........
(०७) Write + or - in the bracket.
10 ( ) 5 = 5
(०८) 14 ( ) 4 = 18
(०९) 28 = .......tens + ......ones. 
(१०) 5 tens + 7 ones = .........
(११) In each set there are two objects that go together. Circle them.*
😊😊😊,  😊😊,  🚲🚲,  🏘,🏚⛱,⛱⛱,⛱⛱⛱.

Learning outcomes~ *
(01) Students develop there thinking power.
(02) Students develop their listening and speaking skills.
(03) Students listen to the sounds and other features of spoken English.
(04) Students listen to respond appropriately.
(05) Students listen attentively for an increasingly longer period.
(06) Students listen to get the central idea.
(07) Students listen to find specific information.
(08) Students get information from the teacher.
(09) Students listen to increase the vocabulary.
(10) Students speak confidently and fluently.
(11) Student speak appropriately keeping in mind relationship with the listener.
(12) Students speak in face to face situations.*

Concept and written by~
Santosh M. Manwar
z.p.u.p.school Panchala.
****